Posts

Showing posts from February, 2018

SEX आणि समाजाचा दृष्टीकोन..

Image
      " SEX" हा शब्द चार चौघात उच्चारला तरी आजूबाजूची माणसं पाप केल्यासारखं तोंडाकडे बघत बसतात . आणि जर एखाद्या मुला - मुलीने लग्नाआधी सेक्सचे संबंध ठेवले असतील तर काही विचारायलाचं नको . शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि ते संबंध पवित्र आहेत हे ठरवण्यासाठी लग्न करावं लागतं. आणि मग तेच संबंध पवित्र असं आपण म्हणतो .       लग्नाला एक वर्ष देखील पूर्ण न होता त्या जोडप्याला जेव्हा मुलं होणार हे समजल्यावर ती गोष्ट आनंदाची मानली जाते . आणि ते नैतिक देखील ठरवलं जातं. पण तेच एखादा मुलगा आणि मुलगी सलग पाच ते सहा वर्ष Relationship राहून त्यांनी संबंध ठेवले तर ते नितीविरुद्ध आहे असा Tag लाऊन आपला समाज मोकळा होतो . म्हणजेच लग्नासारख्या सो कॉल्ड पवित्र मानल्या जाणाऱ्या बंधनात मनं जुळलेली नसतानाही शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी असते. अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे .     Sex हि खूप सुखद आणि आनंद देणारी गोष्ट पण त्याला आपण पवित्र अपवित्र यासारख्या संकल्पनेत का बसवतो? आपण पाश्यात संकृती स्वीकारली आहे अस म्हणतो. मग या एका मुद्यावर आलो कि क...

शुभ मंगल "सावधान"

Image
डोक्यावर अक्षता पडण्याच्या वेळी म्हटलं जाणारं शुभ मंगल सावधान का म्हटलं  जातं. ' सावधान म्हणजे पुढे धोका आहे जाऊ नये हा असाच असतो.   एकप्रकारचा तो ईशारा असतो. तरीही आंतरपाटाच्या दोन बाजूंना असणारे ते दोघेही भटजींचा हा मंत्र अगदी हसतमुख रित्या ऐकत असतात . भटजी जणू   शक्य तितक्या कठोर , रुक्ष , मोठ्या स्वरात ' सावधान ' उच्चारून   ईशारादेत असतो. पण त्या दोन व्यक्तींना आनंदाच्या आणि कौतुकाच्या माहोल मध्ये काही समजून येत नाही. आणि नकळत ते दोघेही   हव्या हव्याश्या वाटणाऱ्या No Entry मध्ये प्रवेश करतात .      सुरवातीला सगळं छान अगदी मराठी चित्रपटातात दाखवतात ना तसं नजर लागण्याजोगं. पण जस चिंगम चघळून त्याची साखर संपून जाते त्याप्रमाणे नवीन लग्नसराई जुनी होत गेली कि तिच्यातली गोडी कधी हवेत विरून जाते त्या दोघांनाही   कळतं नाही मग रोमियोचा होतो   हिटलर आणि त्या ज्युलीएट ची होते दुधारी.   तेव्हा त्या तेव्हा त्या दोघांनाही आठवतो भटजीने म्हटलेला तो मंत्र “ शुभ मंगल सावधान ”            तुझ्या...

"M" For "Miड्ल क्लास"

      एक तर माणसानं गरीब तरी असावं  किंवा खूप श्रीमंत तरी असावं पण मिड्ल क्लास मात्र असू नये. कारण मिड्ल क्लास लोकांची परिस्थिती म्हणजे म्हणजे अवघड जागेच दुखण जे सांगताही येत नाही आणि लपवता देखील येत नाही. गरीब भिक मागून गुजारा करतो. आणि आपल्या श्रीमंतांचे तर थाटाचं वेगळे.  पण तरीही कितीही आणि काहीही झालं तरी Miड्ल क्लास माणूस हा बेस्टच असतो कस ते आपण पाहूया        हो कारण त्याला आवडतं मांडी मारून जेवण्याच्या पंगतीत बसायला, त्याला आवडतं ट्रेनच्या गर्दीत रोज लटकायला. तो एकाचवेळी अनेक गोष्टी करतो, एकीकडे भिकाऱ्याला चिल्लर तर दुसरीकडे, अंबानीच्या संपत्तीची चर्चा करत असतो .रोज डब्यातली बटाट्याची भाजी खाऊन तो कंटाळतो, पण तोच पावा मधला बटाटावडा मात्र आवडीने खातो. त्याला काट्या चमच्याने  खाणे जमतच नाही कारण आपल्या पाच बोटांशिवाय त्याची भूक कधी भागत नाही. घरी आल्यावर आपल्या बायका मुलांवर चीड-चिड करण म्हणजे त्याचा जन्मसिद्ध हक्कच असतो, पण त्याचं लोकांसाठी काय करता येईल याचा विचार मात्र तो सतत करत बसतो. थोडीशी घासाघीस केल्याशिवाय त्याची कधी खर...